Tuesday, April 25, 2017

कर्तव्य आणि अधिकार

रात्रीच्या जेवणाची वेळ होती. कॅन्टीन मध्ये फक्त स्टाफचे नेहमीचे मेंबर असल्याने कॅन्टीनची खाणावळ  झाली होती. जेवणा बरोबर गप्पा हि रंगल्या होत्या. आज झुणका, भाकर, भरीत असा अस्सल मराठी बेत होता आणि भुर्के मारत जेवण चालले होते. तिकीट चेकर गोखले, बुकिंग क्लार्क इनामदार, पार्सल क्लार्क लोखंडे, तिकीट कलेक्टर गुप्ते आणि अजून काही मंडळी नेहमी रात्रीच्या जेवणाला कॅन्टीनला असत. आजचा गप्पांचा विषय होता भ्रष्टाचार.
   तो ऑगस्ट 2011 चा शेवटचा आठवडा होता. भारताचा कोना कोपरा अण्णा हजारेंच्या आंदोलनात पेटलेला होता. जो तो "लोकशाहीचे खरे अर्थ", "सरकार आणि त्याचे कर्मचारी कसे जनतेचे नोकर असतात", "नियमाचं पालन स्वतः तर करावच, आणि इतरांना करायला भाग पाडण्यास घाबरू नये" असल्या गोष्टी करत होता. मी देखील कॅन्टीन मधून थोडा वेळ काढून अण्णा हजारेंना पाठिंबा देण्यासाठी केलेल्या मोर्च्यात सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचलला होता.

 "भ्रष्टाचाराचं तर असं आहे कि if there is no one to give bribe there will be no one to take it. जो पर्यंत लोकं लाच देत आहे लोकं घेणं कसं बंद करतील."  गोखल्यांनी पहिला मुद्दा मांडला.

"गोखले साहेब तुम्ही जे इंग्रजी सुभाषित म्हणाला ते इंग्रजांनी काढलेली पळवाट आहे. अहो इंग्रजांच्या राज्यात सगळे पदासीन अधिकारी इंग्रज किंवा त्यांचे आश्रित असत. त्यांची सुटका करायला आणि भारतीयांना बरोबरीने जवाबदार ठरवायला त्यांनी हे खूळ काढले. स्वतंत्रताप्राप्ती नंतर हि ते तसंच सुरु राहिले. एकाकडे तुम्ही कर्तव्य दिलं आणि अधिकार हि दिले आणि त्या कार्याबद्दल तुम्ही त्यास पगार हि देत आहात. आता तो मनुष्य जर लाच खातो हा नक्कीच लाच देण्यापेक्षा मोठा गुन्हा ठरला पाहिजे. लाच देणाऱ्याकडे काहीहि  अधिकार नसतात. काही देशांनी लाच देणं हे गुन्हांच्या यादीतून काढून टाकलं, तिथे लाच लुचपत एकदम कमी झाली. भारतात लाच घेणारा घाबरत नाही कारण लाच देणारा हि गुन्हेगार असल्याने तो पण गप्प बसेल ह्याची त्याला खात्री असते" गुप्त्यांनी एकदम सणसणीत उत्तर दिलं. 
"गुप्ते तुमचे म्हणणे तसे चूक नाही. पण एक गोष्ट सांगू का.  भारतात काय पण कुठल्या हि देशाच्या जनतेचं आणि नियमांचं पटत नाही. काही देश वगळले तर सगळीकडे नियम हे मार्ग सोपा करण्याऐवजी कटकटीच निर्माण करणारे असतात आणि त्या मुळे लोकांना पळवाट ही हवी असते. भारतात तर लोक आपले अधिकार गाजवत नाही आणि कर्तव्य हि पाळत नाही. सरकारी कामाशी आपला जितका कमी संबंध येईल आणि जितक्या लवकर तिथून आपली सुटका होईल ते बघतात. इंग्रज गेले पण अजुन सरकार आणि जनता एक दुसऱ्याला आपलं समजतं  नाही." गोखल्यांनी सांगितलं. 

"अगदी बरोबर, परवाचीच गोष्ट घ्या. ३२८९  अपची साखळी प्लॅटफॉर्म सोडल्या सोडल्या ओढली  गेली. सेकंड AC  च्या डब्यात एका देशपांडे बाईंनी ओढली होती. बाई मुंबईच्या कुठल्या कॉलेजच्या प्रोफेसर होत्या. त्यांना साखळी ओढायाचं कारण विचारलं तर उलट आमच्यावरचं चिडून म्हणाल्या कि माझ्या कंपार्टमेंट मध्ये लाईट आणि AC  दोन्ही बंद आहे म्हणून मी साखळी ओढली. आम्ही त्यांना आधी थोडं समजवायचा आणि नंतर थोडी नियमाची भीती दाखवायचा प्रयत्न केला. AC  सुरु नसणे हे चेन ओढायला समर्पक कारण नाही आणि तुम्हाला भुर्दंड भरायला लागेल असं म्हणून बघितले. पण बाई काही ऐकत नव्हत्या. उलट त्याच आम्हाला म्हणाल्या कि मी आनंदाने भुर्दंड भरते पण तुम्ही मला लिहून द्या कि गाडीचा लाईट आणि AC सुरु नाही मग मी बघते दंड कोणाला होतो आणि भुर्दंड  कोणाला. आम्हाला आधी वाटलं कि यांचं काही पोलिटिकल कनेक्शन असेल, पण तसं  काही नव्हतं. त्या तत्वाला अडून बसल्या होत्या. आम्ही त्यांना आश्वासन दिले कि पुढल्या स्टेशनवर दुरुस्त होईल सध्या गाडी जाऊ द्या. त्यावर त्यांने आम्हाला सांगितले कि तुम्ही माझ्या बरोबर पुढच्या स्टेशनपर्यंत चलत असला तरच तुमच्या वर विश्वास ठेवते. थोड्या वेळाने त्यांच्या सहप्रवास्यांनाही कंटाळा आला आणि त्यांने सुद्धा बाईची समजूत घालायला सुरुवात केली. सगळेच आपल्या विरुद्ध बघून बाई वरमल्या आणि "लोकांना आपल्या हक्कांची जाणीव नाही तर मला काय" असा म्हणत  आपला हट्ट सोडला."  गुप्ते म्हणाले. 
"अण्णा हजारे पुष्कळ जनता जागृती करतात आहे. पण त्या बाई आपल्या कामात अगदी प्रामाणिक असतील का ? काही लोक आपला हक्क सोडत नाही पण आपली जवाबदारी मनावरचं घेत नाही." मी संभाषणात उतरलो.
"तुम्हाला शनिवारी स्टेशनच्या बाहेर ट्रैफिक जाम झाला होता त्याची हकीकत माहित आहे"    बुकिंग क्लार्क  इनामदार नेहमी प्रमाणे कथा सांगायच्या आधीची प्रस्तावना मांडत म्हणाले.

"माहीत असो की नसो आता इनामदार कही गोष्ट सांगितल्या शिवाय राहणार नाहीत"  गोखले.

इनामदार साहेबांना कथा छान रंगवून सांगत असत. त्यांने सांगायला सुरु केलं .

"तर मग ऐका . शनिवार रात्री मी माझ्या मित्रांबरोबर स्टेशनच्या बाहेरच्या आदर्श रेस्टारंट अँड बार मध्ये जेवायला घेतो होतो. आपण तसलं काही घेत बीत नाही, पण मित्र घेतात आणि मग गप्पा चांगल्या रंगतात. रात्री साडे नवाच्या सुमारास बाहेर आलो तर पूर्ण ट्रॅफिक खोळंबलेला. दोन्ही कडून हॉर्न बोंबलत होते. थोडा पुढे जाऊन बघितले तर एक काका कार मधून ओरडत होते "मैं अपनी गाड़ी साइड से नहीं निकलेगा". ते अर्थातच त्या घोळक्यचे केन्द्रबिंदू होते. रोड वनवे होता अणि काका बरोबर दिशेने येत होते पण रात्रीची वेळ बघून चुकीच्या दिशेने पुष्कळ वाहनं आली होती आणि काकांची गाडी त्यामुळे सरळ पुढे जाऊ शकत नव्हती. समोरून येणाऱ्यांनी आपली वाहने थोडी बाजुला करून काकांना जरा वळून पुढे जायची वाट करून दिली पण काका तत्वाला अडून बसले होते कि मी बरोबर आलो आहे तुम्ही सगळे चुकीच्या दिशेने शिरला आहात, मी माझी वाट वाकडी करून जाणार नाही तुम्ही सगळे मागे जा मगच मी माझ्या रस्त्यावरून सरळ जाईन. समोरून आलेली सगळी माणसं काकांकडे असहाय होऊन बघत होती. काकांने या खेळाची पहिली फेरी जिंकली होती. 

 काकांच्या या करारी बाण्यामध्ये अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा प्रभाव स्पष्ट दिसत होता. "आम आदमी" आपली ताकद दाखवत होता आणि  स्वतः बरोबर असला तर गर्दीच्या समोर उभा राहायला घाबरत नव्हता. 

 लवकरच खोळंबलेल्या लोकांचा धीर सुटायला लागला. १-२ रिक्षावाले काकांच्या वर धावून आले. आम्ही मित्र जे मजा पाहत उभे होतो आम्हाला वाटलं कि आता मारामारी झाली तर आम्हाला काकांना वाचवायला हवें. ज्या मित्रांने जेवणा बरोबर इतर स्फूर्तिदायक पेय घेतले होते त्यांचा उत्साह दांडगा होता. पण त्यांचा तोंडाला सुवास येत असल्याने त्यांनी रस्त्यावरच्या भांडणात मध्यस्थाची भूमिका घेणे  त्यांनाच धोक्याचं झाले असते. आम्ही काकांपेक्षा पुष्कळ  लांब होतो आणि रिक्षावाले त्यांच्या जवळ आले होते म्हणून आम्हाला काहीच करता आले नाही, पण त्याची गरजही लागली नाही. रिक्षावाले येतांना बघून काका स्वतः गाडीतून बाहेर आले आणि म्हणाले "गलत साईड से आप लोग घुसा है और आपको मेरे को मारने का है? तो मारो!! मै यहीं खड़ा है, लेकिन साइड से गाड़ी नहीं निकालेगा". काकांचे हे वाक्य ऐकुन रिक्षावाले थंड पडले. मारामारी कशी करायची हे त्यांना माहित होतं पण कुणी विनम्रतेने मार खायची तयारी दाखवली तर काय करायचं हे त्यांना out of course होतं. 
काकांनी दुसरी फेरी पण जिंकली होती.

आता मात्र काकांनी हे प्रकरण आणखी ताणायला नको असं सगळ्यांना वाटायला लागले होते. त्यांच्या मागेही बरीच वाहनं थांबली होती आणि ती तर बरोबर दिशेने शिरली होती मग त्यांना त्रास कशासाठी?  काकांनी आपला निषेध पूर्ण नोंदवला होता. आता हा वाद नियमासाठी नसून अहंकारासाठी होतं आहे असे वाटायला लागले. दोन्ही बाजुंनी दिवसभराचे थकलेले, वैतागलेले, काहींची गाडीची वेळ झालेली, काही गाडीतून उतरून घरी जायला निघालेले सगळे लोकं काकांकडे आशेने बघत होते. पण काका हट्टाला पेटले होते आणि स्वत:च्या गाडीच्या समोर उभे राहून लोकांना मागे जायला सांगत होते आणि आम्ही पान खायला निघालो होतो हे विसरून पुढे काय होतं हे बघायला तिथेच थांबलो.

  तेवढ्यात मागून एक गुंड कॅब ड्राइव्हर येतांना दिसला. त्याने कोणाला बोलायची संधी दिली नाही आणि सरळ काकांवर धावला. आम्हालाही पुढचा अंदाज आला आणि आम्ही काकांना वाचवायला पुढे झालो. पण आम्हाला तिथे पोहोचायला थोडा उशीर झाला. सुदैवाने हातघाईत काकांना मार बसला नाही पण ते रस्त्यावर घसरून पडले.  त्या गुंडाला देखील काकांना फक्त दम द्यायचा होता मारायचे नव्हते. आम्ही काकांना उचलले आणि त्यांचे कपडे झटकले. काकांच्या बाजुने एवढी माणसे बघून तो गुंडं मागे झाला आणि ओरडला "खाली पीली सबका टाइम खोटी काय को करता है तेरे को जगह दी है वहां से वट ले
  गुंडाचा हा अवतार बघुन काका वरमले. पुढे मागे न बघता ते आपल्या गाडीत बसले आणि थोडं वळण घेऊन आपल्या वाटेला गेले. लगेच सगळी वाहनं सुरु झाली आणि आम्ही पानाच्या दुकानाकडे निघालो.  पान खाऊन परत त्या रस्त्यावर आलो तेंव्हा गर्दी ओसरली होती. तेवढ्यात आम्हाला ते काका परत येतांना दिसले. "पिक्चर अभी बाक़ी है मेरे दोस्त" चंद्रलोकात फिरत असलेला मित्र पुटपुटला. काका पायीच येत होते. विचारल्यावर कळले की काकांचे क्रेडिट कार्ड हरवले आहे आणि जेथे ते घसरून पडले होते तेथे कार्ड पडले असेल असा त्यांना संशय आहे. रात्री १० वाजता आम्ही रस्त्यावर काकांचे कार्ड शोधत होतो. संध्याकाळी पाऊस पडल्या असल्याने रस्त्यावर डबकी झाली होती. काकांनी आपल्या मुलाला फोनकरून बोलवले होते. तेवढ्यात मागून कुणीतरी विचारले "उधर गाडी किसने खड़ी की है ?" कुठल्यातरी अपार्टमेंटचा वाॅचमॅन आला होता. 
"मेरी गाड़ी है, मेरा कार्ड खो गया है" काका समजूत घालत म्हणाले.
"लेकिन उधर no parking है, हमारे अपार्टमेंट के लोगों गाड़ी निकलने को प्रॉब्लम हो रही है" वाॅचमॅन तक्रारीच्या स्वरात म्हणाला. 
यावर काकांचे उत्तर ऐकुन आम्ही कार्ड शोधणं थांबवलं आणि आपापल्या घरी निघालो. काका त्या वाॅचमॅनला पटवून देत म्हणत होते 
"उन लोगों को गाडी को साइड से निकालने को बोल ना" "


"वा म्हणजे काकांना थोडा त्रास झाला आणि सगळे नियम खड्यात"  लोखंडे म्हणाले.

"अहो सगळी कडे असंच असतं. जर आपला फायदा असला किंवा विशेष त्रास नसला तर आपण नियम पाळत असतो" गोखल्यांच्या मुद्द्याचा पुरावा मिळाल्याने ते उत्साहाने म्हणाले.

"पण सगळे असेच नसतात, काही लोकं खरे नियमाचे पक्के असतात" गुप्ते पॉईंट सोडायला तय्यार नव्हते.

" character is the thing which one does when no one is looking. पुष्कळ लोकं फक्त लोकांना दाखवण्या साठी स्वतः ची एक इमेज बनवण्या साठी प्रामाणिकपणाचं सोंग करतात. " - गोखले.

"अहो परवा पोस्टात अशीच घटना झाली" लोखंडे अपनी हकीकत सांगायला लागले.

"एका  शनिवारी मी पोष्टात NSC संबंधित कामा साठी गेलो होतो. पोष्टात जाताच पुलंचा "माझे पौष्टिक जीवन" हा लेख आठवला. पोस्ट ऑफिस मधलं  वैभव आता उरलं नाही. कामासाठी तेथे आता कोणी गर्दी  करत नाही. खाजगी पत्र तर कालबाह्य झाली आहेत. आपल्या शाळेत सुट्टीच्या दिवशी गेल्यावर जस उदास आणि सुनं वाटतं तसंच काही पोष्टात वाटत होतं. २ कॉउंटर्स, पहिल्यावर लोक registered पोस्ट करायला आलेली आणि दुसऱ्यावर PPF , NSC  सारखी इतर आर्थिक कामं. रांकेत २-३ लोक. आणि माझा पुढे खरंच सांगतो पहिल्या गोष्टी सारखेच (तेच नव्हे) एक काका. पोस्ट मास्टर साहेब वयस्क होते, आणि तसे विनम्र आणि हसरे होते. काकांचा आणि मास्तरांची वादावादी चालली होती. काकांची NSC mature  झाली होती पण त्यांने ती वेगळ्या हापिसातून घेतली होती. आणि ह्या शाखेत त्याचा चेक मिळवायला अँप्लिकेशन, ऍड्रेस प्रूफ, आयडेंटिटी कार्ड असल्या पुष्कळ भानगडी काकांना करायला लागल्या होता. ते ३-४ आठवड्या पासून चकरा टाकत होते पण दुसरा हापिसातून approval आलेल नव्हता. 

"मैने  कल  चेक किया था उस  ऑफिस से कोई चेक नाही आया  है, हां अभी एक बंडल आया है पर सॉर्ट नही  हुआ है, पता नहीं उसमे आपका लेटर है या नहीं। थोडी देर रुकना पडेगा आप दोपहर को आईये" मास्टर समजावत होते. 

"अरे साहेब अब मैं  दोपहर को फिर कैसे आऊंगा, लडके को शनिवार को ही वक्त होता है, वो ३-४ हफ्ते से हर शनिवार मुझे सुबह यहाँ छोड़ता  है, और दोपहर को  मेरा काम होगा या नहीं पक्का नहीं है. आप उस ऑफिस फ़ोन करके पूछ लीजिये ना की मेरा लेटर भेजा  है या नहीं" 

"मैंने आज सुबह ही फ़ोन किया था, वहां का आदमी आज छुट्टी पर है"

"ऐसे कैसे वो छुट्टी पर है पर है, मेरा पैसा लेने के लिए मुझे कितना परेशान कर रहे हैं. हमारे पैसे से ही आपको तनख्वाह मिलती  है" काकांनी एकदम सूर बदलला

"चुप कर के ज्यादा नहीं बोलना" मास्टर बंगलोरी हिंदीत चिडून बोलले. "चुप करके" चा अर्थ बंगलोरी हिंदीत "उगीच" असा असतो. 

"क्यों नही बोलेंगे, आप सब जनता के नौकर हैं, वो आदमी जो छुट्टी पर  है वो भी हमारा नौकर है, आपको हमारा काम अभी करना  पडेगा. 

मास्तरांचा चेहरा रागानी लाल झाला होता, हाथ कापत होते. हे बघून एक कर्मचारी त्यांच्या जवळ आला आणि त्यांना चहा देत देत म्हणाला "आरामागीइरु. चहा कुडी.  मनसक्के तोगोबेडा " (शांत व्हा आणि चहा घ्या. मनाला लावून  घेऊ नका).  मग तो काकांना बघून म्हणाला "मै  देखता आपका काम". 
काकांनी पहिली फेरी जिंकली होती. 
मास्टर मागे खुर्ची वर बसून चेहरा पाडून चहा पीत होते. नंतर इतर स्टाफ कडून कळलं की ते पुढच्या महिन्यात retire  होणार आहेत, आणि त्यांचा कर्तृत्वा मुले त्यांना पोष्टात पुष्कळ मान आहे. 
दुसऱ्या माणसांनी बंडल उघडल आणि सर्वात वरतीच काकांचं पत्र होतं. 

काकांनी दुसरी फेरी सुद्धा जिंकली होती. 

त्यांना आता आपण मास्तरांना उगीच बोललो अस वाटायला लागले होते. मास्तर पण रिटायरमेंट ला आले आहेत ये ऐकून काकांच्या मनात त्यांच्यासाठी सहानुभूती निर्माण झाली होती.  मास्तर चहा संपवून माझं काम बघत होते.  त्यांनी मास्तरांशी थोड गोड बोलायचा प्रयत्न केला. 
"सर १ महिने से हर हफ्ते आ रहा हूं, लडका सुबह छोड के जाता है वापस बस से जाना पडता  है. रिटायर्ड हूँ  पैसे लडके से मांगने पड रहे हैं, बहुत प्रॉब्लेम है"
"कोई बात नहीं.  हमारे हाथ में भी तो कुछ नहीं था ना , उस ऑफिस से लेटर नहीं आता तो हम कुछ नहीं कर सकते थें"- मास्तर 
"ठीक है सर कोई बात नहीं" - काका आता एकदम खुशीत आले होते. 
काकांचा चेक तयार झाला, सही साठी तो मास्तरांकडे आणला गेला. मास्तरांनी काकांना चेक दाखवला आणि सही करणार तेवढ्यात काका म्हणाले. 
"अरे इस चेक पर तो  मेरा पूरा नाम है, मिडिलनेम "कुमार" सहित, क्या आप चेक सिर्फ मेरे  नाम और सरनेम पर लिख सकते हैं, मेरा बैंक अकाउंट इसी नाम से से है"
"आपके NSC  पर जो नाम है वही नाम हम लिख सकते हैं, हम तो नौकर हैं जो नियम है हमें उससे  ही जाना पड़ता है" आता संधी मास्तरांची होती. 
"अरे साहब देख लीजिये ना थोड़ा और टाइम लगे तो भी कोई बात नहीं, ये इनकम टैक्स के चक्कर में कौन पड़ेगा, कोई थोड़ी बहुत सेवा करनी हो तो  भी चलेगा" काका एकदम नियमावरून घसरत म्हणाले. 
माझं काम पण झालं होता म्हणून मी पण आपल्या घरी जायला निघालो"

"मग काय निष्कर्ष आजच्या सभेचा?" गोखलयांनी विचारले.

"अहो कसला निष्कर्ष, आपल्या लोकांना स्वराज्य आल्यानंतर सर्व सोयी हव्या पण नियम पाळायला नको" गुप्ते म्हणाले.

"नाही हे सर्वांशी सत्य नाही. लोकांना सर्व हक्क हवे आणि नियम पाळण्याचा अभिमान हि हवा फक्त त्या नियमांनी त्यांना त्रास होता काम नये"

"हे बरोबर " सर्वांची मतं शेवटी जुळली.









Thursday, April 6, 2017

चित्रहार (मराठी)

१९८५-१९८६ च्या दरम्यान टीव्ही नावाच्या जादूगाराने सगळ्या भारताला सम्मोहित केले होते. त्याआधी दैनंदिन मनोरंजन म्हणजे फक्त रेडिओ किंवा वाचन होते. नाटक आणि सिनेमा महिन्या दोन महिन्यातून एकदा बघितला जायचा. लोकं संध्याकाळी एकमेकांच्या घरी सहज भेटायला जात असत. सध्या ही पद्धत लोप पावली आहे. मनोरंजनाच्या व्यतिरिक्त टीव्ही ने पुष्कळ सामाजिक बदल ही घडवले. लोक टीव्ही  बघण्यासाठी एकमेकांच्या घरात जमायची. पूर्ण आळीत, चाळीत, वाड्यात, किंवा गल्लीत एक टीव्ही पुरायचा. एका खोलीत १० बायकांना अर्धा तास गप्प बसवणं (चित्रहार पाहत) हे फक्त टीव्हीलाच जमलं. आमची गोष्टं  त्याच काळातली आहे.
 आमच्या रेल्वे कॉलोनीत पहिला टीव्ही आला स्टेशन मास्टर (SM) साहेबांच्या घरी EC  कंपनीचा ब्लॅक अँड व्हाईट. तसे इंजिनियर आणखीन अन्य बडे अधिकार्यांकडे सुद्धा टीव्ही होते पण रेल्वे कॉलोनीतला सार्वजनिक टीव्ही स्टेशन मास्तरांचा  होता. याच टीव्ही वर कपिल देव ने १९८३ चा क्रिकेट वर्ल्ड-कप जिंकला होता. मास्तरांकडे  सर्वांना टीव्ही  बघायला जायची मोकळीक होती. रविवारी तर सकाळ पासून सगळी मुलं त्यांच्या घरी जमायची. त्यांची फक्त ही अपेक्षा असायची कि रात्री ८:३० नंतर लोकांनी आपापल्या घरी जावे. लोकं सुद्धा त्याला मान देऊन ८:३० नंतर तेथे थांबत नसत. चित्रहार, छायागीत, रविवारचा सिनेमा या कार्यक्रमांना सगळे त्यांच्याकडेच असायचे. स्टेशन मास्तरांच्या पत्नींना गर्दीमुळे थोडा त्रास होत असे पण त्याचे पुष्कळ फायदे हि असल्याने त्या तक्रार करत नसत. घरी टीव्ही बघायला आलेली मुलं त्यांच्या घरची कामं ख़ुशीने करून देत असत. टीव्ही बघायला सगळ्या बायका त्यांच्या घरी जमायच्या म्हणून कॉलोनीतल्या सगळ्या घडामोडी त्यांना घरी बसल्या कळू लागल्या आणि महिला मंडळात त्यांचा रुबाब वाढला.
 पण वाईट असो कि चांगला, काळ बदलतोच. काही दिवसांनी ASM (असिस्टंट स्टेशन मास्तर) कडे हि तोच EC  कंपनीचा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला आणि सगळी गर्दी आता ASM  कडे वळायला लागली. ASM  ने ८:३० चे  बंधन ठेवले  नव्हते.  श्री आणि श्रीमती SM ला गर्दी कमी झाल्याने बरे वाटले होले. आता ते घरी लोळून, गाणी म्हणत कसे हि TV  बघायला मोकळे होते. पण ASM  च्या घरी जमलेल्या गर्दीमुळे SM साहेबांना थोडा मत्सर वाटू लागला. श्रीमती SM ची महिला मंडळाच्या मानाची जागा श्रीमती ASM नि पटकावला मुळे त्या हि चिडचिड करायला लागल्या होता.
"मेला टीव्ही घरात आल्यामुळे एवढं मिरवायला नको. आणखीन सगळ्या जमतात छायागीत कि चित्रहार बघायला. गाणी कसली ऐकतायेत, चकाट्या पिटायला अड्डा जमतो सगळा. "
 SM साहेब चतुर होते, त्यांना आपल्या कडे गर्दी नको होती पण ASM चे महत्व हि कमी करायचे होते म्हणून त्यांनी एक युक्ती काढली. एक दिवशी ते कॅन्टीन मध्ये मिठाईचा पुडा घेऊन आले आणि घोषणा केली
  "मी नवीन रंगीत TV  घेतला आहे, गणोबा सगळ्यांना पेढे दे".
 आणि आता कोणा कडे टीव्ही बघायला जायचे हा प्रश्न लोकांना पडायच्या आधीच त्यांनी आणखीन एक घोषणा केली.
"माझा जुना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही  उद्या पासून कॅन्टीन मध्ये ठेवला जाईल म्हणजे कोणाला टीव्ही बघायला कोणाच्या घरी जायची गरज पडणार नाही."

SM साहेबांनी एका दगडात तीन पक्षी मारले. पहिला, माझ्या सारखा टीव्ही कॉलोनीत कोणा कडे नाही. दुसरा,  ASM कडे गर्दी करायची आता गरज नाही; आणि तिसरा म्हणजे ASM  सारखा टीव्ही  तर मी दान सुद्धा करू शकतो.
 ASM आणि अरसिक लोकांनी टीव्ही  कॅन्टीन मधे ठेवायचा विरोध केला. त्यांच्या मते या मुळे लोकांचं लक्षं  कामात लागणार नाही. कॅन्टीन मध्ये विक्री नीट होणार नाही, प्रवाशांना त्रास होईल. पण इतर सर्व टीव्ही  ठेवायच्या पक्षात असल्याने असे ठरले कि २ आठवडे टीव्ही कॅन्टीन मध्ये ठेवला जाईल. जर कॅन्टीन मध्ये गोंधळ झाला, यात्रींची तक्रार आली किंवा याने कॅन्टीनची विक्री कमी झाली तर टीव्ही कॅन्टीन मधून काढून घेण्यात येईल.
 पण झाले याचा विपरीत, लोकं आपली कामे पटकन उरकून टीव्ही बघायला यायला लागली. प्रवासी मंडळी  टीव्ही  बघायला कॅन्टीन मध्ये यायची आणि काही तरी खायला हि मागायची म्हणून कॅन्टीनची विक्री वाढली. गाडीची वाट पाहताना टीव्ही बघायची करमणूक झाली म्हणून कोणीही तक्रार केली नाही.
 कॅन्टीन मध्ये टीव्ही आला आणि सगळं काही बदलले. पूर्वी ओसाड पडलेले कॅन्टीन आता नेहमी लोकांनी गजबजलेले राहू लागले. प्लॅटफॉर्म रेल्वे कॉलोनीला लागून असल्याने ऑफ-ड्युटी पुरुष आणि मुलं तेथे यायची. बायका मात्र परत श्रीमती SM कडे रंगीत टीव्ही बघायला जमायच्या. गावाकडे शेत असलेले हमाल, गॅंगमन आणि इतर मंडळी "आमची माती आमची माणसे" बघायला यायची. तिकीट कलेक्टर जोशींचे वडील रिटायर्ड प्रोफेसर होते ते दुपारी UGC चे शैक्षणिक कार्यक्रम बघायला यायचे. पार्सल क्लार्क सुब्रमण्यम रात्री लुंगी नेसून १० वाजताच्या इंग्रज़ी बातम्या ऐकायला यायचे.
 खरी गर्दी असायची चित्रहार आणि छायागीतच्या वेळेस बुधवारी आणि शुक्रवारी. त्या वेळेस कुठल्याही गाडीची वेळ नसायची आणि सगळं स्टाफ हळू हळू तिथे गोळा व्हायचा.
 पण खरी मजा झाली ती त्या बुधवारी. दयाशंकर आणि हजारी प्रसाद हे दोघं हमाल हिंदी सिनेमांचे दर्दी होते. दयाशंकर इलाहाबादचा असल्याने अमिताभ बच्चनचा फॅन होता. दर बुधवारी प्रत्येक गाण्यापूर्वी दयाशंकर म्हणायचा "अगला गाना बच्चन का आएगा". पुढे पुढे सर्वांना या गोष्टीचा त्रास व्हायला लागला. हजारी प्रसाद हमाल जो दयाचा मित्र होता त्याने दयाची मजा करायचे ठरवले.
पुढच्या बुधवारी पहिल्या गाण्यापूर्वी दया परत  म्हणाला "अगला गाना बच्चन का आएगा".
हे ऐकताच हजारी म्हणाला  "दया बहुत सुन लिया तेरा। अब अगर पहला गाना अमिताभ का नहीं आया तो तू मुझे चाय पिलायेगा"
"हां पक्का!!" दया उत्साहाच्या भरात म्हणाला.  
पण पाहिलं गाणं  "तू गंगा की मौज़ मैं जमुना का धारा" होतं  आणि हजारी पैज जिंकला.

दुसऱ्या गाण्या पूर्वी दया परत ओरडला  "अगला गाना पक्का अमिताभ का आएगा".
हज़ारी त्याला खिजवत म्हणाला  "नहीं आया तो मुझे सुबह का नाश्ता करवाना पड़ेगा"
'चल  ठीक है" दया म्हणाला. 
पुढचं गाणं  "ज़िन्दगी एक सफर है सुहाना" होता. दया परत हरला .

आता दयाला कळले कि हजारी त्याचा फायदा घेत आहे. मग तो हजारीला म्हणाला 
  "हज़ारी अब तू बता अगला गाना कौनसा होगा। "

" मेरे को नहीं मालूम" मिस्कीलपणे हसत हज़ारी म्हणाला. 

"ऐसे नहीं चलेगा, तेरे को भी अंदाज़ा लगाना पड़ेगा वरना चाय नाश्ता भूल जा। "

"नहीं ऐसे नहीं!! शर्त तो ऐसी नहीं लगी थी दया, हमने तुझे कहाँ बोला था की तू अगला गाना किसका आएगा ये बता। "
लोकांना हा आरडा ओरडा आवडला नाही आणि सगळ्यांनी त्या दोघांना शांत बसायची किंवा बाहेर जाऊन भांडायची ताकीद दिली. 
आणि पुढचं गाणं अमिताभच आलं  "रोते हुए जाते हैं सब। "

"मैं जीत गया" दया ओरडायला लागला. 

हज़ारी म्हणाला "नहीं ऐसा थोड़े ही होता है तूने इस बार कहा बोला था कि अगला गाना अमिताभ का होगा। "

त्या दोघांची बाचाबाची सुरु झाली आणि लोकांनी त्यांना कॅन्टीनच्या बाहेर काढलं.

दुसऱ्यादिवशी सकाळी दया आणि हजारी माझ्या कडे आले आणि मला त्यांच्या भांडणाचा निकाल लावायला सांगितले. मी हजारीला समजावले कि दया हरला आहे हे खरं असलं तरी शर्यत दोन्ही कडून लागली पाहिजे. यावर हजारी म्हणाला कि पुढच्या बुधवारी चित्रहार मध्ये १ गाणं तरी राजेश खन्नाचं असेल आणि नसलं तर मी दयाला २ रुपये देईन.  हजारी राजेश खन्नाचा फॅन आहे हे तेंव्हा मला कळले.
दयाने अमिताभचं  गाणं न आल्यास हजारीस २ रुपये देणं कबूल केलं. पण हजारीला दयावर विश्वास नव्हता.  शेवटी हे ठरले कि दोघांनी माझ्याकडे २-२ रुपये द्यायचे आणि जो जिंकेल त्याला मी पैसे देणार.
पुढच्या बुधवारी "मेरे सपनो की रानी " गाणं आलं आणि मी हजारीला ४ रुपये दिले. तिथे हजर असलेल्या सगळ्या स्टाफ ने या बद्दल चौकशी केली आणि पुढे यावर पुष्कळ गप्पा झाल्या. 
 पुढच्या बुधवारी चित्रहार सुरु होण्या आधी  माझ्या कडे १० हिरोंची नाव आणि २० रुपये होते. ६ लोकांचा अंदाज बरोबर ठरला आणि मला १२ रुपये द्यावे लागले, ८ रुपये माझ्या खिशात गेले. 
२-३ आठवडे अशेच गेले आणि मग मला समझले कि माझ्या नकळत मी या रेल्वे प्लॅटफॉर्मवर चित्रहारच्या गाण्यांचा सट्टा चालवायला लागलो होतो. 
 कॅन्टीनच्या काउंटर वर १ कार्डबोर्ड चा विटे एवढा बॉक्स ठेवला गेला. त्यावर पैसे आणि चिट्ठ्या टाकायला १ भेग पाडली होती. लोकं एका कागदावर हिरो किंवा हिरोईन चे नाव लिहून त्या कागदामध्ये काही पैसे ठेऊन बॉक्स मध्ये टाकायची. बुधवारी चित्रहार मध्ये ज्याचे गाणे आले त्याला दुप्पट पैसे. सुरुवातीला करमणूकीसाठी सुरु झालेल्या या खेळाचा नंतर लोकं पैसे मिळवायचं साधन म्हणून उपयोग करायला लागले . कधी कधी लोकं १०-२० रुपये सुद्धा लावायची. मला हि या खेळ मुळे दर बुधवारी १० ते २० रुपये मिळायला लागले. 
नंतर लोक नट नटीच्या जोडीला गायक गायिकांची नावें हि टाकायला लागले. महंमद रफी आणि लता मंगेशकर यांची गाणी प्रत्येक चित्रहारात हटकून यायची, एका बुधवारी मला पुष्कळ पैसे द्यावे लागले आणि म्हणून मी या खेळात फक्त नट नटींची नावे स्वीकार करायला लागलो. 
  आता चित्रहारला गर्दी वेगळीच असायची. लोकं आपल्या चिट्टीतल्या नटाच्या गाणं यायची वाट बघायची  आणि गाणं आला कि आरडा ओरड आणि हंगामा  करायला लागायची. मला सिनेमाची खूप माहिती नसल्याने कधी कधी वादावादी हि व्हायची. 
 एका माणसाने धर्मेंद्र च्या नावाची चिट्ठी टाकली आणि "तुम पुकार लो" या गाण्यानंतर माझ्या कडे पैसे मागायला लागला. मला धर्मेंद्र कुठे हि दिसला नव्हता पण त्याच्या मते धर्मेंद्रला या गाण्यात पाठमोरा दाखवले होते.  
दर बुधवारी असले हंगामे आणि चकमकी होत असल्याने जी मंडळी खरंच गाण्यांचा आस्वाद घ्यायला जमायची त्यांना त्रास होऊ लागला. त्यांनी या सट्ट्याबद्दल स्टेशन मास्तरांकडे तक्रार केली. स्टेशन मास्तर माझ्या परिचयाचे होते. त्यांनी मला हा सगळा प्रकार बंद करायची ताकीद दिली आणि मी हि ते मान्य केलं. 
  पण या खेळाने मला पैसे मिळू लागले होते म्हणून मी गुपचूप या खेळ सुरूच ठेवला. या खेळात भाग घेण्यारांना ताकीद दिली कि कुणी हि चित्रहारच्या वेळेस एक शब्द सुद्धा काढायचा नाही. दर गुरुवारी सकाळी पैशाच्या हिशोब केला जाईल. आणि कोणी किती पैसे लावले आणि कोण जिंकलं या वर कुठे हि चर्चा करायची नाही. 
 खेळ सुरुच राहिला. मला कधी कधी १०० रुपये सुद्धा मिळायचे. सगळ्या स्टेशनला आता बुधवारच्या चित्रहारचे वेध लागलेले असायचे.  मी आता शुक्रवारच्या मराठी छायागीत करता एक वेगळा बॉक्स ठेवायच्या विचारात होतो पण एका बुधवारी परत मजा झाली.
 रामचंद्र गॅंगमन पहिल्यांदा या खेळात शामिल झाला आणि त्याने एकट्याने १०-१० रुपयाच्या ५ चिट्ठ्या टाकल्या. प्रत्येक चिट्ठी वर नावाबरोबर एक संख्या हि लिहिली होती.

१. प्रदीप कुमार 
२. विश्वजीत 
३. नादिरा 
४. सुनील दत्त 
५. वहीदा रहमान

आणि त्या बुधवारी ही गाणी या क्रमाने आली. 

१. जो वादा किया वो निभाना पड़ेगा।
२. पुकारता चला हूँ मैं।
३. आगे भी जाने ना तू.
४. ना मुह छुपा के जियों
५. पिया तोसे नैना लागे रे.


रामचंद्रांची सगळीच नावेच त्याच क्रमाने आली होती. त्या बुधवारी पहिल्यांदा मला या खेळात नुकसान झाले तेही ५० रुपयाचे. मी रामचंद्राला याच गुपित विचारले पण तो माझ्या कडे बघून हसला आणि निघून गेला. 
पुढच्या बुधवारी रामचंद्रने २०-२० रुपयाच्या ६ चिठ्ठया टाकल्या आणि परत सगळी गाणी त्याने सांगितलेल्या क्रमाने आली आणि मला १०० रुपयाचा फटका बसला. रामचंद्राला कुठली गाणी येणार आहे ये तर माहिती होतच, शिवाय ती कुठल्या क्रमाने येणार आहे आणि गाणी ५ येणार आहेत कि ६ ये सुद्धा बिनचूक माहित होता. मला काही समजे ना. 
 रामचंद्र काही केल्या आपला गुपित सांगत नव्हता आणि मला १५० रुपये गमावल्या नंतर हा खेळ सुरु ठेवायची हिम्मत नव्हती. मी रविवारी रामचंद्राला घरी बोलावून जेवायला बोलावलं आणि चांगली दारू पाजली. तो तरी काही सांगायला तय्यार नव्हता. शेवटी त्याला खेळ बंद झाल्याचे कळले तेंव्हा त्याने 'अंदर की बात' सांगितली. त्याचा खुलासा ऐकून मी तीन ताड उडालो. त्याला दर बुधवारी सकाळी स्टेशन मास्तर या चिट्ठ्या आणि पैसे देत होते आणि गुरुवारी रामचंद्र जिंकलेले पैसे परत मास्तरांना द्यायचा. त्याला या कामासाठी १० रुपय मिळत होते. 
 सोमवारी मी कॅन्टीनच्या काउंटरवरचा बॉक्स काढून टाकला आणि एक बोर्ड ठेवला ज्यावर "आज पासून सर्व बंद" एवढंच लिहिलं. स्टेशन मास्तर दुपारी जेवायला कॅन्टीन मध्ये आले पण मी त्यांची नजर चुकवत आपले काम करत राहिलो. 
 जेवण नंतर जेव्हां ते आपला खोलीत एकटे होते मी भीत भीत त्यांना भेटायला गेलो. 

" काय गणोबा, कसं काय चाललं आहे? "

"साहेब आपल्याला सगळं माहितंच  आहे" मी खाली मन घालूनच बोललो. 

"तर रामचंद्राने सगळं सांगितलं तुम्हाला" साहेब हसत म्हणाले. 

"आता काय बोलू साहेब, आज पासून सगळं बंद" 

"असं तुम्ही आधीही बोलला होता" मास्तर मिस्कीलपणाने म्हणाले. 

"साहेब हा तर फक्त खेळ होता. तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगतो. आपल्या या खेड्यात करमणुकीचे काय साधन आहे. थोडा फार विरंगुळा तर हवा ना. तुम्ही स्वतःच सांगा कि सगळा  स्टाफ पूर्वीपेक्षा तरतरीत आणि उत्साही असतो कि नाही. या स्टेशनवरचा स्टाफ वर्षानुवर्षे तेच काम करतो आहे, त्याला काही चैतन्य काही नावीन्य नको का? माणसाला जगायला काही स्वप्न, काही संघर्ष नको का, तेच तेच काम करून सगळे विटून गेले होते, या खेळाने सगळ्यांची थोडी करमणूक झाली तर काय बिघडलं ?" 

"गणोबा वक्तृत्व स्पर्धेत करतात तसली भाषणं केली तरी खोट्याचं खरं करू शकणार नाही. आता मला सांगा जर हा खेळ होता तर मग आज "आज पासून सगळं बंद" अशी पाटी का लावली आहे ? तुम्ही हरला म्हणूनच ना? जेव्हां तुम्ही हरला तेंव्हा तुम्हाला हा खेळ नकोसा झाला. कधी विचार केला आहे कि जेव्हां तुम्ही जिंकला तेव्हां लोकांनी किती पैसे हरले असतील? बिचारी लोकं घाम गाळून पैसे मिळवतात ते काय सट्ट्यात गमावण्यासाठी?  कॅन्टीन मध्ये TV करमणूकी साठी ठेवला होता सट्ट्यासाठी नाही. 
 आणि स्वप्नं आणि संघर्षाचं म्हणाल तर लोकांकडे चांगले आणि सकारात्मक पर्याय असतात पण ते कठीण असतात. लोकांना स्वप्न हवी, संघर्ष हवे पण फक्त सोपी, ज्यासाठी परिश्रम लागत नाही ती. तुमच्या प्रमाणे या खेड्यात करमणुकीचे साधन नाही, तुम्ही ही समस्या का सोडवत नाही? आपला कॉलोनीत एक रिकामं पडलेलं मैदान आहे, तिथे खेळाची सोय करणं हे स्वप्नं नाही होऊ शकत आणि त्यासाठी संघर्ष नाही केला जाऊ शकत? मी सांगतो तुम्ही जे चालवलं होतं ते स्वप्नं नव्हें व्यसन होतं. प्रत्येक व्यसनामागे ध्येय नाही, संघर्ष चैतन्य नाही असल्याचं  काही तरी सबबी सांगितल्या जातात  मग ते व्यसन जुगार असो, दारू असो कि सिगारेट. हे उसने चैतन्य, संघर्ष सोपे असतात कारण ये थोडे से पैसे खर्च करून विकत घेता येतात आणि नंतर ये व्यसनच त्यांच्या आयुष्याचं संघर्ष होऊन जातं." 

"साहेब चूक झाली, खरंच आज पासून सगळं बंद" 

"ठीक आहे, मग जा आता, झालं ते विसरून जा" 

"पण साहेब..." 

"गणोबा तुम्हाला तुमचे हरलेले पैसे नाही मिळायचे " साहेब हसत हसत म्हणाले. 

"नाही साहेब पैसे नको, मला अजून हा उलगडा झाला नाही कि तुम्ही गाणी कशी ओळखली" खरं तर मला पैसेच हवे होते पण मी लगेच पवित्रा बदलला. 

"ते तर सोपं आहे, माझा भाचा दिल्ली दूरदर्शनला कामाला आहे आणि टेलीफोन बद्दल तुम्हाला माहीतच असेल " 
"बरं साहेब मी जातो" 

" गणोबा थांबा, ये घ्या १५० रुपये जे मी २ दिवसात जिंकले आहेत. आपल्या कॉलोनीतलं मैदान स्वच्छ करवून घ्या. १ फ़ुटबाँल आणि व्हॉलीबॉल हि विकत घ्या आणि एक स्पोर्ट्स क्लब सुरु करा. तुमच्या त्या खेळाच्या सगळ्या लोकांना या क्लबात शामिल करा म्हणजे त्यांची सगळी प्रतिस्पर्धी, संघर्ष आणि घ्येय बाहेर येईल. आणि हां मी पण तुमच्या खेळात होतो नाही का, मी सुद्धा येत जाईन रोज संध्याकाळी. TV पण व्यसनच आहे रात्री थोड्या वेळच पुरे, जास्त नको" 
























 









Wednesday, March 15, 2017

प्रस्तावना (मराठी)


  रेल्वे या गोष्ट लहानपणी पासूनच सगळ्यांनाच कुतूहल असते. लहानमुलांना झुकझुक गाडी वाफ उडवत जाताना दिसली तर त्यांचा चेहरा प्रसन्न होतो.  सगळ्यांनाच रेल्वेचा कुठला ना कुठला प्रवास नेहमी आठवत असतो. रेल्वे स्टेशनवर जमणारे प्रवासी एकाच दिशेला जात असले तरी त्यांचे स्वभाव वेगळे असतात. प्रवासामुळे त्यांना एकमेकांचा सहवास घडतो किंवा इच्छा नसताना हि त्यांना एकमेकांचे सहयात्री बनावं लागतं. त्यानून कधी संघर्ष निर्माण होतात तर कधी संकट. कधी मजेदार प्रसंग येतो तर कधी भीतीदायक.
 असलेच काही प्रसंग आपल्या पुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. तर करायची लोहमार्गी कथांना सुरुवात. गोष्टी ज्या  ट्रेन मध्ये सापडल्या.
सगळ्या गोष्टी आणि पात्र लेखकाच्या कल्पनेवर आधारीत आहेत. कुठल्या हि जीवित किंवा मृत पात्राशी साम्य  वाटल्यास तो एक योग योग समजावा.
 दर आठवड्याला एक गोष्ट मालिकेच्या स्वरूपात प्रकाशित केली जाईल.





Thursday, March 9, 2017

ठेव ( मराठी )

 माझे नाव गणोबा, वय ५५ वर्षे. मी वलसाडच्या रेल्वे स्टेशनवर कॅन्टीन चालवतो. चालवतो म्हणजे सगळा कारभार बघतो. या  मी कित्येक प्रसंगं, भानगडी, किस्से आणि भांडणं बधितली आहेत. त्यातल्या काही आठवणीत कायमच्या मनात राहिल्या. त्यातलीच एक हकीकत इथे सांगतो आहे.

 पाच वर्षां पूर्वीची गोष्ट आहे. एक दिवशी सकाळी मी कॅन्टीनमध्ये एकटाच होतो. कुठल्या हि गाडीची वेळ नसल्याने कॅन्टीन रिकामेच होते. आमचे स्टेशन मास्टर कुलकर्णी माझ्या जवळ येऊन बसले. कुलकर्णी साहेब प्रामाणिक, कुटुंब वत्सल, सरळ मार्गाने चालणारे होते. बेताची उंची, थोडेशे स्थूल, स्टेशन मास्टर जरी असले तरी त्यांची मूर्ती कुठल्याही रिटायरमेंट जवळ आलेल्या कारकुनाला शोभेल अशी होती. प्रामाणिक किंव्हा कर्तव्यनिष्ठ लोकांचे दोन प्रकार असतात. पहिले थोडेशे भडकू, जास्त ना बोलणारे आणि एकदम कडक असतात. अशा लोकांच्या वाटेला फारसं कोणी जात नाही. दुसरे मनमिळाऊ, गरीब, कुणाच्या अध्यात ना मध्यात, हसरे असतात. कुलकर्णी साहेब दुसऱ्या प्रकारचे प्रामाणिक होते. स्वतःचा डबा घरून आणणारे आणि कॅन्टीनचा १ चहा पण फुकटात ना पिणारे. आज साहेब जरा थोडे अस्वस्थं दिसत होते.
 मी चहा मागवला आणि त्यांना सांगितले कि या चहाचे पैसे मी घेणार नाही कारण हा चहा कॅन्टीनचा नसून माझ्या तर्फे आहे.
नेहमी खळखळून हसणारे कुलकर्णी फक्त स्मित करून परत आपल्या विचारात गेले.

मग मी सरळ सरळ विचारले "काय साहेब तब्बेत बरी नाही का ?"

"गणोबा तुझ्या बरोबर कधी असं झालं आहे कि तुला कोणी आपली वस्तू सांभाळायला दिली आणि त्यामुळे तुला नाकी नऊ आले ? " साहेबांनी मलाच उलट प्रश्न केला.

"प्रत्यक्ष माझ्या बरोबर तर नाही पण मागे एकदा बिहारमधून एक स्टेशन मास्टर कुमार साहेब सेमिनार साठी आले होते त्यांनी मला बिहार मध्ये घडलेली अशी एक हकीकत सांगितली होती." मी सांगितलं.

"मग सांग बघू काय सांगितलं होत कुमार साहेबांनी, माझं आपण नंतर बघू."

"दोन वर्षांपूर्वी मला कुमार साहेबांनी हा किस्सा सांगितला, म्हणजे काही दहा वर्षांपूर्वींची गोष्टं असेल. तेंव्हा ते बिहारच्या चंदनगढ स्टेशनावर स्टेशन मास्टर होते" मी सांगायला सुरुवात केली.

"आडगावच स्टेशन, स्टाफ सुद्धा जेमतेमंच. काही मोजक्या गाड्या तेथे थांबायच्या. जवळंच मोठं स्टेशन पाटणा असल्याने २-३ पाटणा पेसेंजर गाड्या चालायच्या. त्या काळी चंदनगढ आणि जवळच्या गावात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता. गावात सगळं लुटून झाल्यावर दरोडेखोर आता ट्रेन प्रवाशांची लुटालूट करायला लागले होते. रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्म वर सुद्धा धावा बोल करून यायचे आणि प्रवाशांना लुटायचे. रेल्वे आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र ते त्रास देत नसत आणि कर्मचारी पण दरोडेखोरांकडे काना डोळा करायचे. बहुतेक त्यांचा हा एक मूक करारच होता.
 एका रात्री कुमार साहेब आपले काम संपवून घरी निघाले होते.  प्लॅटफॉर्मवरच एका गरीब दिसणाऱ्या माणसाने त्यांना थांबवले आणि माझी मदद करा अशी विनंती करू लागला. तो मनुष्य उत्तरप्रदेशच्या लखनौचा राहणारा असून पाटण्याला जात होता. त्याला वाराणसीला गाडी बदलायची होती पण पहिली गाडी उशिरा आल्याने त्याची गाडी चुकली होती. तो कसाबसा बस ने धडपडत चंदनगढ पर्यंत आला होता आणि दुसरा दिवशीच्या पेसेंजर ने पाटण्याला निघणार होता.
"साहेब मला रात्र या गावात काढायची आहे, बहुतेक मी प्लॅटफॉर्मवरच असेन पण इथे दरोडेखोरांचा त्रास आहे आणि माझ्या जवळ दहा हजार रुपये आहेत, ते ही माझे नाही, माझ्या मालकाने त्याच्या मुलाला पाटण्याला माझ्या मार्फत पाठवलेले आहेत. हे पैसे लुटले गेले तर मालक माझं काही ऐकणार नाही मला नोकरीवरून काढून टाकेल. मी एक गरीब कारकून आहे. माझी मदद करा. आज रात्री पुरते हे पैसे आपल्या जवळ ठेवा. सकाळी पाटणा पेसेंजर सुटण्याआधी मी तुमच्या कडून परत घेईन." तो मनुष्य विनवून म्हणाला.

कुमार साहेब विचारात पडले.
'हा मनुष्य तर खरंच गरीब वाटतो, मला त्याची मदद करायला हवी का? पण स्टेशन मास्टर प्रवाशांच्या  मौल्यवान वस्तूंची जवाबदार कशी घेऊ शकतो. आज हा आला आहे उद्या सगळे येतील.'

"तुम्ही रेल्वे पोलीसांकडे का जात नाही ?" कुमार साहेबांनी सुचवले.

"साहेब पोलीसांचा धाक असता तर दरोडेखोर इतके माजले असते का?  माफ करा साहेब पण मला पोलीसांवर  विश्वास नाही. त्यांना माझ्या जवळ पैसे आहे कळलं तर तेच दरोडेखोरांना बोलवतील.  मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, माझी मदद करा. " तो काकुळतीने म्हणाला.

कुमार साहेबांचा मनात विचारांनी थैमान घातले
' मी या माणसाची मदद का करावी? माणुसकी म्हणून? शरणागताची मदद करा असं शास्त्र सांगते म्हणून? पण ये काही रामराज्य नव्हे, मला व्यावहारिक पातळी वर विचार करायला हवा. जर दरोडेखोरांना ये कळलं तर? आमचा मूक करारच मी मोडला आहे म्हणून माझ्यावरच ते उलटले तर? माझ्या मुलांचे, बायकोचे संरक्षण मला आधी बघायला हवे. या माणसाने दुसऱ्याची मोलाची वस्तू आपल्या जवळ ठेवण्याची चूक केली आहे, पण ती चूक मी करणार नाही.'

"अहो पण माझी तब्बेत बरी नाही, मी उद्या स्टेशन वर येऊ नाही शकलो तर तुमचे पैसे अडकून राहतील. एवढं घाबरू नका. परिस्थिती एवढी वाईट नाही. कशावरून आज दरोडेखोर येतीलच, आणि आलेच तर तुम्ही  स्वच्छतागृहात किंवा स्टॉलच्या मागे कुठे तरी लपा. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सहजच कुठे तरी लपू शकता."  अशी सांत्वना देत कुमार साहेब आपल्या घरी गेले.

सकाळी कुमार साहेब प्लॅटफॉर्मवर आले तर त्यांना कळले कि रात्री ३ वाजला दरोडा पडला. प्लॅटफॉर्मवर उभी असलेली गाडी, प्लॅटफॉर्म आणि वेटिंग रूम च्या सगळ्या प्रवाशांना लुटले गेले. काही लोकांना मारहाण हि करण्यात आली होती. कुमार साहेबांच्या पोटात गोळा आला.
'अरेरे बिचार्याला मार पडला, पैसे हि गेले आणि आता नोकरी पण जाईल'.

त्यांचे कामात मन लागे ना. पाटणा पेसेंजर सुटण्यात होती आणि कुमार साहेबांना गार्डशी काहीतरी बोलायचे  होते म्हणून ते प्लॅटफॉर्म वरून गार्डच्या डब्याकडे चालायला लागले. मग त्यांच्या डोक्यात आले कि तो मनुष्य याच गाडीत बसला असेल. ते त्या माणसाचा डोळा चुकवत, गाडी कडे न बघता चालायला लागले. पण आपलं मन चंचल असतं  जिथे बघायचे नाही अस ठरवलं  तर नेमकं तिथेच बघायला लावतं . कुमारांना एका खिडकीत तो मनुष्य बसलेला दिसला. नजर चुकवून जाणार तेव्हड्यात त्याच माणसांनी यांना नमस्कार केला. त्यांनी घाबरत घाबरत त्या माणसाकडे बघितले.  तो मनुष्य अनपेक्षितपणे स्मित करत होता. कुमारांनी काही विचारायच्या आधीच तो म्हणाला "साहेब माझे पैसे वाचले".

आश्चर्याने त्या माणसा कडे बघत कुमार म्हणाले "कसे काय? मी ऐकलं कि सगळे प्रवासी लुटले गेले".

"हो मी हि लुटला गेलो मला मारलंसुद्धा, पण माझे पैसे वाचले. तुम्ही धीर दिल्यावर मी बिनधास्त प्लॅटफॉर्मच्या बाकावर झोपलो होतो. राती एक ट्रेन येऊन उभी राहिली, आणि काही वेळाने गाडीमधून आरडा ओरडा ऐकू यायला लागला. मी लगेच ओळखले कि दरोडा घातला जात आहे. मी उठलो आणि प्लॅटफॉर्मच्या दारातुन बाहेर पळून जाणार होतो. पण मग विचार केला कि आपण दरोडेखोर असतो आणि दरोडा घातला असता तर २ मनुष्य दाराशीच बसवली असती पळून जाणाऱ्या लोकांना लुटायला. म्हणून पळून जायेचा बेत रहित केला आणि तुम्ही सुचवल्या प्रमाणे स्वच्छतागृहात आलो. तिथे ५-६ लोकं आधीच जमली होती, बहुतेक गाडी मधून पळून आलेली. परत दरोडेखोरांच्या दृष्टीने विचार केला तर लोकं  स्वच्छतागृहात असतील ये त्यांना माहित असणं सोपं आहे हा काही त्यांचा पहिला दरोडा नव्हे.  म्हणजे तिथे पण भी सुरक्षित नव्हतो.  तिथे फक्त विचार करायला थोडा वेळ मिळू शकणार होता. मग मी लपून राहण्या किंवा पळून जाण्यापेक्षा संकटाला सामोरं जावे असे  ठरवले. माझ्याकडे चामड्याची पिशवी होती पाणी भरायची. आपल्या जवळच्या नोटा काढल्या त्यांची सुरळी  केली त्यावर २-३ पॉलीथिन चा पिशव्या घातल्या आणि त्यांवर रबर बँड लावून त्यांना बंद केले. मग ती सुरळी चामड्याच्या पिशवीत घातली आणि स्वच्छतागृहाच्या बाहेर आलो. लांबून मला १-२ दरोडेखोर माझ्या कडे येतांना दिसले. मी त्यांच्याकडे पाहिलेच नाही आणि आळस देत हळू हळू नळाकडे आलो. उद्देश्य होता कि दरोडेखोरांना वाटावं कि मी आत्ताच झोपेतून उठलो आहे आणि मला लुटी बद्दल काहीच माहित नाही . नळावर पटकन थोडं  पाणी प्यालो आणि मग ती चामड्याची पिशवी नळाखाली धरून पाणी भरायला लागलो.   दरोडेखोर तोवर माझ्या जवळ आले  होते त्यातल्या एकाने माझी माझी कॉलर धरली आणि दुसऱ्याने मला थोबाडीत मारली.  मार पडताच मी पाण्याची पिशवी सोडली आणि जवळची बॅग घट्टं धरायला लागलो. हे बघून त्यांनी माझी बॅग हातातून घेतली आणि त्यातले ४०-५० रुपये काढून घेतले. दुसऱ्याने माझ्या खिसा तपासाला त्यातले  २०-३० रुपये घेतले, माझे कपडे फाडले आणि मला अजून एक थोबाडीत लावून ते पुढे गेले. मी तिथे त्याच अवस्थेत रडत पडला राहिलो म्हणून मागून येणाऱ्या दरोडेखोरांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने पोलीस आले आणि सगळे दरोडेखोर पळून गेले. मी शांतपणे माझ्या पिशवीतून सगळे पैसे काढले. ओले सुद्धा झाले नव्हते. नंतर कळलं कि दरोडेखोरांने स्वच्छतागृहात लपलेल्या लोकांना मारहाण केली आणि सगळं स्वच्छतागृह धुंडाळून ते त्यात लपवलेले पाकीटं, चेना, घड्याळी सगळं घेऊन गेले".

"तुम्ही बॅग सांभाळून चामड्याची पिशवी सोडून दिली हे तर फार छान केलं, म्हणून त्यांचं लक्ष पिशवीकडे गेलंच नाही. पण एक गोष्ट समजली नाही, तुम्ही तुमच्या जवळचे सगळे पैसे पिशवीत का नाही लपवले मग तुमचे काहीच नुकसान झाले नसते"

"साहेब, कोणी मनुष्य प्रवासाला निघाला आणि त्याच्याकडे १ रुपया पण सापडणार नाही हे कसं शक्य आहे? दरोडेखोरांनी मला गुरासारखं बडवून मला विचारले असते कि पैसे कुठे लपवले म्हणून. किंवा त्यांचे लक्ष पिशवी कडे सुद्धा गेले असते "

हे ऐकून थोडं हसून कुमार साहेब गार्डच्या डब्या कडे निघून गेले. "

"गणोबा छान गोष्ट सांगितली. आपल्या कडे बुद्धी असते पण विरोधीपक्षाच्या शक्तीच्या भीतीने आपण त्याचा वापर करायला धजत नाही"  कुलकर्णी साहेब जे इतक्या वेळ लक्षपूर्वक ऐकत होते म्हणाले.

"बरं साहेब माझी गोष्ट तर झाली आता तुमची काय हकीकत आहे ती सांगा."  मी उत्सुकतेने विचारले. 

"माझी हकीकत म्हटलं तर थोडी विचित्रंच आहे, तुझ्या जवळ वेळ असेल तर सुरुवाती पासून सांगतो"  कुलकर्णी साहेब म्हणाले.

"जरूर सांगा, आणि त्या आधी मी आणखी एक चहा मागवतो".

"पाच दिवसांपूर्वी मी १२६५ अप ची वाट बघत होतो. केबिन मधून सिग्नल मिळून गाडी १ नंबर वर येत होती. ASM (असिस्टंट स्टेशन मास्टर) ड्युटी वर असल्याने चार्ट आणि एन्ट्रीज तेच बघत होते. गाडी प्लॅटफॉर्म ला लागली आणि ५ मिनिटांनी १ गृहस्थं माझ्या ऑफिसात शिरले. खादी कुर्ता जाकीट, पांढरा लेंगा, डोक्यावर टोपी, गळ्यात हार,  वय पन्नाशीच्या जवळपास, थोडे से स्थूल आणि चेहऱ्यावर एक कृत्रिम स्मित. ओळखायला वेळ लागला नाही कि हे  पुढारी आहेत. मला वाटलं कि गुजरातचे कुठले मिनिस्टर असतील. त्यांच्या मागे २-३ लोकं आली, एकाच्या हाथात सुटकेस आणि दुसऱ्याच्या हाथात एक कार्डबोर्डचा बॉक्स होता. सामान ठेऊन बरोबर आलेली लोक बाहेर गेली आणि पुढारी मला नमस्कार करत माझ्या समोरच्या खुर्चीत बसले देखील.

"मी चंद्रशेखर पाटील रावळगढहुन आमदार आहे" स्वतःचा परिचय देत ते म्हणाले.

महाराष्ट्राचा आमदार आणि गुजरात मध्ये हा रुबाब. वाटलं कि ह्यांना वेटिंग रूम ची वाट दाखवावी. पण मराठी माणूस बघून मी काही म्हंटलं नाही. आणि खरं सांगू तर रावळगढ ऐकून मी थांबलो, रावळगढला माझी मुलगी आणि जावई राहतात.
त्यांनी मला त्यांच्या प्रवास बद्दल, पक्षाबद्धल आणि राजनैतिक परिस्थिती बद्दल सांगितलं. पक्षाचं नाव महत्वाचं नाही म्हणून ते सगळं गाळून एवढं सांगतो कि त्यांच्या पक्षाचं जामनगर ला अधिवेशन होता. गुजरात मध्ये त्यांची पार्टी नवीनच होती म्हणून इथे जम बसवायला अधिवेशन ठेवले होते. ते इथे गाडी बदलायची असल्याने उतरले होते आणि २ तास घालवायला मी मराठी स्टेशन मास्टर असल्याने माझ्याशी गप्पा मारायला ते माझ्या ऑफिस मध्ये आले होते.
मला जरा आश्चर्यच वाटले.  वलसाड गुजरातेत असलं तरी महाराष्ट्राच्या अगदी जवळ आहे म्हणजे महाराष्ट्र सोडून हे अगदी पहिलच मोठं स्टेशन. या पुढाऱ्यांना महाराष्ट्र सोडल्या सोडल्या मराठीची आठवण येऊन ते माझ्याशी गप्पा मारायला आले असतील का? माझा काही विश्वास बसे ना. नक्की काही न काही काम असेल.
मी विशेष विचार ना करता चहा मागवला आणि इकडल्या तिकडल्या गप्पा मारायला लागलो. सरकारी नोकरांना राजकारणी धोरण ठेवायची सोय नसते आणि धोरण असलेच तरी ते मोकळेपणाने कुठल्याही पुढाऱ्याला सांगणं मूर्खपणाचं असतं. राजकारण, जाती, धर्म हे विषय सोडून इतर विषयावरच गप्पा रंगल्या होता. पुढारी बोलण्यात पटाईत होते आणि माझी हि करमणूक होत होती. आणि मग मी एक चूक करून बसलो. बोलण्याचा ओघात मी त्यांना हे सांगून गेलो कि माझी मुलगी रावळगढला असते आणि लगेच जीभ चावली.
पुढाऱ्यांचा चेहरा एकदम खुलला जणू ते अशाच संधीची वाट बघत होते. त्यांनी लगेच माझ्या कडून मुली आणि जावयाची चौकशी केली, पत्ता घेतला आणि म्हणाले
"तुमच्या मुलीची काळजी सोडा, माझं घर हे आता तीचं  रावळगढ मधलं माहेर".

मला आपली चूक लक्षात आली. स्टेशन मास्टरच्या १० मिनिटाच्या ओळखील त्याच्या मुलीला आपली मुलगी म्हणणं म्हणजे काही ना काही तरी डाव नक्कीच असेलच. माझ्याकडून ते काही तरी वाकडं तिकडं काम करून घेतील आणि मला भिडेखातर नाही म्हणता येणार नाही. मला तसा वाजबीपेक्षा जास्त विचार करायची सवय आहे पण मला नक्की समजले होते कि इथे मी चुकीचा अंदाज करत नव्हतो. गप्पांचा रूळ बदलून मी इकडचं तिकडचं  बोलणं काढलं. मग त्यांच्या करता नाष्टा मागवला पण त्यांनी विनम्रतेने नकार दिला. बऱ्याच वेळ गप्पा चालल्या पण त्यांनी माझ्या कडून काहीही अपेक्षा ठेवली नव्हती. गाडीची वेळ झाली आणि त्यांनी आपल्या बरोबरच्या लोकांना बोलावले, लोकांनी सुटकेस उचलली आणि ते गाडी मध्ये बसायला निघाले. माझ्या शंकेखोर स्वभावाची मलाच थोडी लाज वाटली. मी त्यांच्या मागे त्यांना डब्याशी सोडायला गेलो. डब्यात सामान ठेऊन त्यांच्या बरोबरची लोकं बाहेर आली. पुढाऱ्यांनी मला त्यांच्या कूपे मध्ये बोलावले. माझ्या पोटात परत ढवळलं. मी आत गेल्यावर ते म्हणाले
"अरे हो मी दोन दिवसाने याच वाटेनं परत जाईन तेंव्हा इथे २ तासाचा मुक्काम होईल. तुमच्या मुलीसाठी काही पाठवायचं असेल तर संकोच करून नका".
आता मात्र मी स्वतःच्या जास्ती विचार करणाऱ्या स्वभावावर मनातल्या मनात चिडलो. इतक्या सौजन्यमूर्ती माणसाशी ते फक्त पुढारी आहे म्हणून मी पूर्वग्रह ठेवून वागत होतो.
"मागच्या महिन्यातच मुलगी येऊन गेली म्हणून काही पाठवायचं नाही. पण परत येताना नक्की घरी जेवायला यायचं, घर जवळच आहे २ तासात सहज जाऊन येता येईल, मी वाट बघेन." मी अत्यंत विनम्रतेने म्हणालो.
"मी नक्की येईन आणि आपल्याला एक अजून तसदी देत आहे. त्याचं काय झालं, येतांना एका स्टेशनवर एका स्नेहीने मला इंपोर्टेड व्हिस्की चा एक बॉक्स दिला. तसं मी दारूला हाथ सुद्धा लावत नाही पण मला त्याच मन दुखवे ना म्हणून ती भेट मला स्वीकार करणे भाग होते.  गुजरातमध्ये दारूबंदी आहे आणि अधिवेशनला असली वस्तू बरोबर ठेवणं धोक्याचं आहे. म्हणून मी तो बॉक्स तुमच्या ऑफिस मधेच ठेवला आहे. परवा याच डाउन गाडी ने मी परत येईन तेंव्हा घेऊन जाईन. तुमच्या मुलीची बिलकुल काळजी करू नका. अच्छा गाडीची वेळही झाली आहे. तुम्हालाही कामं असतील. भेटूच परवा.  नमस्कार"
मी परत आपल्या ऑफिस मध्ये येऊन त्या बॉक्स कडे बघितलं. बॉक्स मला वेडावून हसत होता. २ दिवस बॉक्स सांभाळणं काही विशेष नाही पण मला कुठे तरी फसवल्या गेल्या सारखे वाटत होते"  कुलकर्णी मास्टर गोष्ट संपवता संपवता चिडले होते.
"हा हा, अहो मास्तर गुजरात मधल्या दारूबंदीच्या भीतीची सुद्धा थाप असेल. तिथे अधिवेशनला इंपोर्टेड व्हिस्की नेली तर सगळे आलेले सभासद पिऊन टाकतील ही खरी भीती असेल" मी हसत म्हणालो.
"अरे हो हा विचार तर मी केलाच नाही"  कुलकर्णी थोडे मोकळे झालेले वाटत होते. बहुतेक माझ्या जवळ सगळं बोलल्यामुळे त्यांना हलके वाटत होते.

"बरं मग अडलं कुठे, ते आपली वस्तू घेऊन जातीलच" मी विचारलं.

"दोन दिवस हेच समजून मी काही विशेष लक्षं दिलं नाही. पण आता ४ दिवस झाले तरी त्यांचा पत्ता नाही"

"येतील हो तुम्ही काय एवढी काळजी करता"

"कालचा पेपर वाचला? हे पहा"

कालच्या पेपरला फोटोसकट बातमी होती कि  "जामनगरच्या अधिवेशन मध्ये रावळगढचे आमदार चंद्रशेखर पाटील ह्यांनी दारूच्या नशेत हंगामा केला, बायकांची छेड काढली आणि वृत्तपत्रकारांना मारहाण केली. त्यांना तात्काळ पोलिसानी अटक करून त्यांच्यावर दारूबंदी भंग करणे आणि आणखीन काही गुन्हा दाखल करण्यात आले आहेत"
"तर गणोबा, सत्ताधारी पक्ष काही आमदारांना लवकर सोडत नाही. त्यांचा झिंगलेला फोटो आहे, वृत्तपत्रकारही चिडलेले आहे आणि दारूबंदीवर सख्ती दाखवायची ही सुवर्ण संधी आहे. आणि जर १-२ महिन्यात सोडलंच तरी मला वाटत नाही कि एवढ्या प्रकरणा नंतर ते तो बॉक्स घ्यायला इथे येतील."
"हे तर बरोबर आहे साहेब" मी म्हणालो.

"मग आता मी ह्या बॉक्सचं  काय करु? मी काल पासून विचार करून करून थकलो आहे. रेल्वे परिसरात दारूबंदी असतेच वरून हे गुजरात. कोणाला ह्याची बातमी लागली तर मला अटक झालीच. माझ्या या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल. काल संध्याकाळी ASM विचारीत होते कि "सर तुमच्या ऑफिस मध्ये तो बॉक्स कुठला आहे".  मी रिटायरमेंटच्या जवळ आलेला मनुष्य, माझं रेकॉर्ड लखलखीत, दारू कधी जवळून बघितली सुद्धा नाही आणि अशी काही भानगड झाली तर सगळी अब्रू मातीत जाईल. त्या आमदाराबरोबर २-३ लोक अजून होते त्यांनी पोलिसाला बॉक्स बद्दल सांगितलं तर? काल पासून प्लॅटफॉर्मवर उतरणारा प्रत्येक गणवेशधारी किंवा रुबाबदार मनुष्य मला दारूबंदी मोहिमेचा अधिकारी वाटतो आणि असं वाटतं कि माझ्या ऑफिस वर धाड  येईल. काल रात्रभर झोप नाही, सारखं वाटत होत कि माझ्या जवळ बाटल्या मिळाल्या आहे, मला हाथकड्या घालून उभं केला आहे आणि ये बघून कुटुंब रडतं आहे. सकाळी लवकर आलो, या विचाराने कि सगळ्या बाटल्या संडासात रिकाम्या करायच्या. पण दारूला वास असतो म्हणे, सगळ्या प्लॅटफॉर्मवर दारूचा वास दरवळला तर? कुणावर विश्वास नाही आणि स्वतः बॉक्स उचलून नेला तर लोक बघून प्रश्न विचारतील ही भीती. गणोबा तुला हे सगळं सांगितलं खूप हिम्मत करून, तुझ्यावर विश्वास ठेऊन आणि खरं सांगू तर ह्यासाठी सांगितलं की मी पकडला गेलो तर कमीत कमीत तू तरी माझ्याबाजूने  साक्ष देशील"  कुलकर्णी मास्टर हे सगळं सांगताना खूप घाबरलेले होते. 

मी कुलकर्णी साहेबांचं बोलणं ऐकतचं राहिलो. किती दुर्बळ असतो सभ्य समाज. काही केलेलं नाही तरी केवढी भीती. लोकं पण बदनामी चवीने ऐकतात पण खुलासे ऐकत नाही. इतक्या वर्षाची कमावलेली अब्रू जपणं खरंच साहेबांना कठीण जात होता.

"साहेब दाखवा तो बॉक्स मला"

मग साहेब मला त्यांच्या ऑफिस मध्ये घेऊन गेले. त्यांच्या समोर मी तो बॉक्स उघडायला सुरुवात केली.  ते नाही म्हणत होते पण मी ऐकले नाही. बघितलं तर १० बाटल्या होत्या इंपोर्टेड व्हिस्कीच्या.

"जर मी आत्ताच्या आत्ता या बाटल्या इथून घेऊन गेलो तर? " मी मास्तरांकडे बघत म्हणालो.

"गणोबा मी तुला १०० रुपये देईन. तू करू शकतो हे माझ्या करता? " मास्तरच्या कपाळावरच्या आठ्या कमी होत होत्या.

"१०० रुपये नको साहेब, पण आता जरा मोकळं हसा. विसरून जा की कधी तुमच्या कडे या बाटल्या होत्या." मी सरळ बॉक्स उचलून कॅन्टीन मध्ये आणला.

रात्री २ बाटल्या पोलिसानां दिल्या आणि ८ माहितीच्या गिऱ्हाइकांना विकून चांगले ४००० कमावले. सभ्य समाजाची कमाल आहे जिथे पैसे मिळवायची संधी असली कि तिथे हे घाबरून बसतात. आता मी तुम्हाला २ गोष्टी सांगितल्या दोन्ही मध्ये कुणी तर कोणाची वस्तू ठेव म्हणून घेतली आणि पस्तावत होता. पण गरीब माणूस या काळजीत होता कि ती ठेव हरवली तर काय, आणि सभ्य मनुष्य या चिंतेत की वस्तू आपल्या जवळ राहिली तर काय.
 आता थोडं खाजगी.  तुम्हाला थोडा धक्का बसला असेल कि हा गणोबा काही साधा सभ्य माणूस नव्हे. गोष्ट ज्याच्या दृष्टिकोनातून सांगितली जाते त्या पात्रात वाचक स्वतःला शोधतात आणि म्हणून त्याला सौज्वळ, साधा, गरीब, सभ्य समजतात.  तसा मी सभ्य आहे हो पण फक्त उगाच घाबरत नाही आणि जास्त विचार करत नाही. पण मला कुठे काय बोलायचं हे पक्के समजते . उदाहरणार्थं आपले कुलकर्णी साहेब इतके सरळ, साधे माणूस म्हणून मी त्यांना बिहारच्या कुमार साहेबांची गोष्ट थोडी बदलून सांगितली. कुमार साहेबांचे मनाचे विचार मी सरळ आपल्या मनाने ठोकले होते. का? अहो मी कुलकर्णी मास्तरांना ये कसं सांगू शकलो असतो मी कि त्या रात्री दरोडेखोरांना कुमार साहेबांनीच कळवलं होतं कि आज रात्री एक मनुष्य प्लॅटफॉर्मवर असेल, त्याच्या कडे १०००० रुपये असतील आणि तो बहुतेक स्वच्छतागृहात लपलेला असेल.




Wednesday, March 8, 2017

चित्रहार- (हिन्दी)

 बात कोई १९८५-८६ की होगी। तब टीवी ने सारी जनता को सम्मोहित किया हुआ था। पहले आम जनता के लिए मनोरंजन का विकल्प सिर्फ रेडियो और अख़बारों तक सीमित था। टीवी ने लोगों को घर बैठे सस्ता, सामाजिक और नवीन अनुभव दिया। टीवी ने असल में काफी सामाजिक परिवर्तन भी लाये। मोहल्ले या बस्ती में एक टीवी पर्याप्त होता था। सभी लोग उस एक घर में शाम को बिना बुलाये आ जाते थे। चित्रहार के समय एक कमरे में १० महिलाएं बिना एक शब्द बोले आधा घंटे बैठती थी ये ही टीवी की अभूतपूर्व उपलब्धि थी। हमारी कहानी भी उसी वक़्त की है। हमारी रेलवे कॉलोनी में पहला टीवी आया स्टेशन मास्टर के घर १९८३ में जो था EC कंपनी का ब्लैक एंड वाइट। वैसे शायद रेलवे इंजीनियर और दूसरे बड़े अधिकारियों के पास उसके पहले से टीवी हो पर रेलवे कॉलोनी का सार्वजनिक टीवी स्टेशन मास्टर साहब का ही था। रेलवे कॉलोनी निवासियों के लिए कपिल देव ने १९८३ का विश्व कप इसी EC टीवी पर उठाया था। स्टेशन मास्टर बड़े अच्छे स्वाभाव के थे। वो कभी किसी को टीवी देखने के लिए मना नहीं करते थे। रविवार को सुबह उनके घर लोगों का जमावड़ा लगा रहता था। बस शाम को ८:३० के बाद उनकी ये अपेक्षा रहती थी की लोग अपने अपने घर जाएँ। लोग भी खाना बनाने और खाने के लिए ८:३० बजे वहां से चले आते। लोग रात के धारावाहिक खास कर "हम लोग" नहीं देख पाते थे। लेकिन फिर भी किसी को कोई शिकायत नहीं थी। चित्रहार, कृषि दर्शन से लेकर रविवार की 'फीचर फिल्म'; लोग इतने में खुश थे। स्टेशन मास्टर जी की पत्नी को लोगों की भीड़ से थोड़ी परेशानी तो होती थी पर वे भी खुश थी. एक तो इसलिए की टीवी देखने आने वाले बच्चे उनके घर के काम ख़ुशी से कर दिया करते थे और दूसरे वे पूरी रेलवे कॉलोनी के महिला मंडल का केंद्रबिंदु बन गयी थी। कॉलोनी की सारी घटनाएँ टीवी देखने आयी महिलाएं उन्ही के घर पर सबको बताती थी।
 पर वक्त एक सा नहीं रहता। एक साल के बाद अस्सिटेंट स्टेशन मास्टर (ASM) साहब ने भी ब्लैक एंड वाइट टीवी खरीद लिया। उनके घर रात के ८:३० का बंधन भी नहीं रहता था तो धीरे धीरे सारी भीड़ SM के यहाँ से ASM के यहाँ जाने लगी। लोग SM को कहते
"साहब अब हम लोग आपको तकलीफ नहीं देंगे, ASM साहब के यहाँ भी टीवी आ गया है।"
वैसे लोगों की भीड़ जाने से SM साहब और उनकी पत्नी को अच्छा ही लगा था। अब वे शांति से बिना किसी शोरगुल के टीवी देख सकते थे। लेकिन ASM के घर जमी भीड़ को देखकर उन्हें कहीं न कहीं जलन होने लगी।  SM साहब की पत्नी को तो ये बिल्कुल अच्छा नहीं लगा की महिला मंडल का केंद्र अब श्रीमती ASM  हो गयी हैं. SM साहब और ASM साहब वैसे तो काफी घनिष्ट थे लेकिन इस मामले में कहीं ना कहीं SM साहब के अहंकार पर वार हुआ था।
 SM  साहब ने इस समस्या का तोड़ निकाला। एक दिन दोपहर के भोजन के समय कैंटीन में जब ASM साहब और काफी स्टाफ मौजूद था, उन्होंने एक मिठाई का डब्बा मुझे दिया।  फिर सभी को घोषणा करते हुए कहा की "भाई एक खुश खबरी  है. मैंने नया टीवी खरीद लिया है वो भी रंगीन। मोहनलाल सभी को मिठाई दो। "  लोगों ने तालियां बजाई, मिठाईयां खाई. पर इससे पहले की लोग इस  सोच में पड़े की अब टीवी देखने कहाँ जाया  जाए , SM  साहब ने एक और घोषणा कर दी।
"मेरे घर का पुराना ब्लैक एंड वाइट टीवी आज से प्लेटफॉर्म पर कैंटीन में रख दिया जायेगा, ताकि लोगों को टीवी देखने के लिए किसी के घर न जाना पड़े"

ये तो SM  साहब ने कमाल कर दिया। १ तीर से ३ शिकार। पहला, इस कॉलोनी में मेरे जैसा टीवी किसी और के पास नहीं।  दूसरा, टीवी प्लेटफॉर्म पर रहेगा तो उनके घर में भी शांति रहेगी और ASM  साहब के घर का महत्व भी कम होगा. और तीसरा, लोगों को ये दिखा दिया की जो टीवी ASM  के पास है वो तो मैं ऐसे ही दान कर सकता हूँ.
कैंटीन स्टेशन के यात्रियों की संख्या के हिसाब से काफी बड़ा था तो जगह की कमी का मुद्दा ही नहीं था. ASM साहब ने थोड़ा विरोध करते हुए ये कहा की कैंटीन में टीवी रखने से यात्रियों को तकलीफ होगी, लोग भीड़ लगा के रखेंगे और वेटर लोग व स्टेशन  का अन्य स्टाफ अपना काम छोड़कर टीवी देखते रहेंगे। लेकिन बाकि का सभी स्टाफ टीवी के पक्ष में था इसलिए ये निर्णय हुआ की १ हफ्ता टीवी कैंटीन में रखकर देखा जाए- अगर यात्रियों ने कोई शिकायत की, कुछ गड़बड़ हुयी या कैंटीन की बिक्री में कमी आयी तो फिर टीवी हटा लिया जायेगा।
 लेकिन हुआ इसके एकदम विपरीत। टीवी देखने के लिए यात्री कैंटीन में आने लगे और साथ में कुछ खाने को भी लेने लगे इससे कैंटीन की बिक्री बढ़ी। बाकी का स्टाफ जिसके लिए संभव था वो अपना काम जल्दी निपटा कर टीवी देखने आने लगे जिससे काम भी टाइम पर होने लगे। साथ में यात्रियों के लिए भी प्लेटफॉर्म पर प्रतीक्षा करते हुए टीवी देखना अलग अनुभव था इसलिए किसी ने कोई शिकायत भी नहीं की। कॉलोनी स्टेशन से बिल्कुल लग कर ही थी इसलिए सारे ऑफ ड्यूटी पुरुष और साथ में बच्चे टीवी देखने कैंटीन आने लगे. महिलाएं कलर टीवी देखने फिर से श्रीमती SM के घर जाने लगी इससे महिला मंडल में उनका वर्चस्व फिर से कायम हो गया।
 कैंटीन में TV आया और कैंटीन का रंग ही बदल गया।  आम तौर पर कैंटीन में दोपहर और रात का भोजन छोड़ दें तो बस ४-५ लोग रहते थे। लेकिन अब जब भी दूरदर्शन की कोई भी सभा होती कैंटीन भरा भरा रहता। शर्मा जी (TC )  के पिताजी कॉलेज में प्रोफेसर थे और अब रिटायर्ड हो चुके थे। वे दोपहर को UGC (यूनिवर्सिटी ग्रांट कमिशन) के शैक्षणिक कार्यक्रम देखने अवश्य आते। पार्सल क्लर्क सुब्रमण्यम साहब तो रात को १० बजे के अंग्रेजी समाचार देखने के लिए आते थे। लेकिन सबसे ज्यादा भीड़ रहती थी चित्रहार के समय।  बुधवार और शुक्रवार को शाम को ८ बजे किसी गाडी का टाइम नहीं होता था तो मानों सारा प्लेटफॉर्म और स्टाफ कैंटीन में ही आ जाते।
लेकिन असली मज़ा आया उस बुधवार को।  वही चिंगारी थी जिससे आग भड़की और फिर अगले कईं हफ्ते सुलगती रही। बात ऐसे थी की दयाशंकर कुली जो अमिताभ बच्चन का फैन था हर गाना शुरू होने के पहले "अगला गाना अमिताभ का ही आएगा" की रट लगाए रहता।  १-२ हफ़्तों के बाद उसकी ये आदत से सब चिढ़ने लगे। उस दिन चित्रहार शुरू होने के पहले दयाशंकर फिर से बोला की पहला गाना अमिताभ का आएगा.
ये सुनते ही उसका साथी कुली हज़ारी प्रसाद चिढ कर बोला  "दया बहुत सुन लिया तेरा। अब अगर पहला गाना अमिताभ का नहीं आया तो मुझे चाय पिलानी पड़ेगी। "
दया मान गया. पहला गाना "तू गंगा की मौज़ मैं जमुना का धारा" था तो हज़ारी शर्त जीत गया.
पहला गाना खत्म होने के पहले आदतानुसार दया फिर से बोला "अगला गाना पक्का अमिताभ का आएगा".
हज़ारी ने फिर से उसे उकसाया "नहीं आया तो मुझे सुबह का नाश्ता करवाना पड़ेगा"
अगला गाना "ज़िन्दगी एक सफर है सुहाना" था. हज़ारी फिर जीत गया.
अगले गाने के पहले दया फिर बोला "अगला गाना तो पक्का ही अमिताभ का आएगा"
अब हज़ारी का उत्साह भी बढ़ गया था वो बोला "और अगर नहीं आया तो मुझे ५ रूपए देना पड़ेंगे। "
दया मान गया और ५ रूपए भी हार गया. अगला गाना "बाबूजी धीरे चलना" था।
अब दया को होश आया की हज़ारी उसे मूर्ख बना रहा है।
इस बार दया हज़ारी का बोला के  "हज़ारी अब तू बता अगला गाना कौनसा होगा। "
" मेरे को नहीं मालूम" हज़ारी मुस्कुराते हुए बोला।
"ऐसे नहीं चलेगा, तेरे को भी अंदाज़ा लगाना पड़ेगा वरना चाय नाश्ता और पैसे भूल जा। "
"नहीं ऐसे नहीं!! शर्त तो ऐसी नहीं लगी थी दया, हमने तुझे कहाँ बोला था की तू अगला गाना किसका आएगा ये बता। "
और फिर दोनों की तू-तू मैं-मैं शुरू हो गयी. लोगों को चित्रहार में शोरगुल पसंद नहीं आया और उन्होंने दोनों को चुप रहने को या बाहर जाकर लड़ने को बोला।
और अगला गाना अमिताभ का आ गया "रोते हुए जाते हैं सब। "

ये देख कर दया कहने लगा की "मैं जीत गया। "
हज़ारी बोला "नहीं ऐसा थोड़े ही होता है तूने इस बार कहा बोला था कि अगला गाना अमिताभ का होगा। "

इस पर दोनों एक दूसरे से भिड़ गए. दोनों को लोगों ने कैंटीन के बाहर किया।

सुबह हज़ारी और दया दोनों मेरे पास आये और मुझसे कहा की इस बात का फैसला करे की हज़ारी को चाय, नाश्ता और पैसे मिलने चाहिए या नहीं। मैंने हज़ारी से कहा देख भाई वैसे तो तू शर्त जीता है लेकिन बेचारे दया के बारे में सोच वो अमिताभ का भक्त है इसलिए उसने ऐसा बोला। उसकी भावना को समझ और उसे बेवकूफ मत बना।  शर्त लगनी है तो दोनों तरफ से लगनी चाहिए।
"ठीक है, तो कल शुक्रवार का चित्रहार आएगा उसमे राजेश खन्ना का १ गाना ज़रूर होगा अगर नहीं आया तो मैं दया को २ रूपए दूंगा." हज़ारी राजेश खन्ना का भक्त था ये मुझे तब पता चला.
"ठीक है हज़ारी, अगर कल अमिताभ का १ भी गाना नहीं आया तो मैं तुझे २ रुपये दूंगा".
"मुझे तुझ पर विश्वास नहीं दया, तू २ रुपये निकाल के मोहनलाल जी को दे दे, मैं भी देता हूँ. शर्त ऐसे पक्की होगी".
दया मान गया और दोनों ने मुझे २-२ रूपए निकल कर दे दिए.

शुक्रवार के चित्रहार में राजेश खन्ना का "मैंने तेरे लिए ही सात रंग के" गाना आया और अमिताभ का कोई गाना नहीं आया. मैंने चित्रहार खत्म होने के बाद हज़ारी ४ रूपए दे दिए.
हज़ारी ने मुझे उसमे से २५ पैसे दिए और कहा "आप भी रखो थोडे। "
दूसरे कुलियों और स्टाफ ने इस पैसे के लेनदेन के बारे में पूछताछ की और फिर इस विषय पर काफी गपशप भी हुयी.
अगले बुधवार को चित्रहार शुरू होने से पहले मेरे पास २० रूपए थे और १० हीरो के नाम. जिस जिस के बताये गए हीरो के गाने आएंगे उस उस को मुझे ४ देने थे और बचा हुआ सारा पैसा मेरा. उस दिन मुझे १४ रूपए देने पड़े और ६ रूपए मेरी जेब में गए. एक दो हफ़्तों के बाद मुझे पता भी नहीं चला की कब मैं इस स्टेशन प्लेटफॉर्म पर चित्रहार का सट्टा चलाने लगा था. कैंटीन के काउंटर पर मैं १ छेद वाला बक्सा रखने लगा, लोग अपना नाम और हीरो का नाम एक कागज़ पर लिखते और उस कागज़ के अंदर पैसे रख कर कागज़ मोड देते और डब्बे में डाल देते। जिसके हीरो का गाना आता उसे मैं दुगुने पैसे देता.  शुरू शुरू में ये खेल मज़े के लिए चल रहा था पर बाद में लोग उसे पैसे कमाने का जरिया समझने लगे. कभी कभी कोई १०-२० रूपए रूपए भी लगा देता. मुझे इस खेल में हर बार कम से कम १० रूपए का फायदा होता। बाद में लोगों ने अभिनेत्रियों के नाम लिखना भी शुरू किया वो भी मैंने मंज़ूर किया.  लेकिन फिर एक दिन मुझे "मोहम्मद रफ़ी" और "लता मंगेशकर" की चिट्ठियां मिली और चूँकि इन दोनों के गाने तो चित्रहार में आते ही थे मुझे काफी पैसे देने पड़े. फिर मैंने सिर्फ अभिनेता और अभिनेत्रियों के नाम ही स्वीकार करना शुरू किया. पहले लोग अपने पसंदीदा कलाकार पर पैसे लगते थे लेकिन बाद में लोग पैसे कमाने के लिए प्रसिद्ध अभिनेता और अभिनेत्री पर पैसे लगाने लगे.  सबसे ज्यादा पैसे लगते राज  कपूर,दिलीप  कुमार, देव आनंद,  धर्मेंद्र, जीतेन्द्र, अमिताभ और राजेश खन्ना पर. जब किसी के हीरो का गाना आता तो वो ख़ुशी से शोर मचाने लगता। कभी कभी लोग झगडे भी करते थे. एक बार एक धर्मेंद्र की चिट्ठी वाला आदमी मुझसे पैसे मांगने लगा क्योंकि "ख़ामोशी" फिल्म  का "तुम पुकार लो" गाना आया था. मैंने कहा मुझे तो धर्मेंद्र की शक्ल नहीं दिखी तो  उसका कहना था की गाने में धर्मेंद्र को पीछे से ही दिखाया गया है लेकिन है धर्मेंद्र ही.  कुल मिला के चित्रहार धीरे धीरे गानों का आनंद लेने की बजाये जुआ खेलने का साधन बन गया.  और जो लोग संगीत प्रेमी थे उन्होंने SM के पास इसकी शिकायत की. SM साहब मेरे काफी परिचय के थे.  उन्होंने मुझे ये सब बंद करने को कहा, मैंने उन्हें आश्वस्त किया की ये सब बंद हो चुका समझिये।  लेकिन मुझे भी इस काम में मज़ा आने लगा था और पैसा भी मिलने लगा था, तो मैंने ये सट्टा चालू ही रखा।  बस लोगों को कहा की चित्रहार के समय सारे गाने लिख लिए जायेंगे और पैसे का हिसाब अगले दिन सुबह होगा. अगर किसी ने चित्रहार के समय ज़रा भी शोर मचाया तो उसके सारे पैसे जब्त माने जायेंगे और उसे इस खेल से हमेशा के लिए बाहर कर दिया जायेगा. किसने किस पर पैसे लगाए हैं और कौन कितना जीता है ये भी सब को नहीं बताया जायेगा. लोग भी इस खेल में काफी डूब चुके थे तो उन्होंने भी मेरा साथ दिया. हर चित्रहार पर कम से कम २० चिट्ठियां आती थी तकरीबन ५० रूपए लगते थे. मुझे ३० से ४० रुपये देना पड़ते थे .
 लेकिन एक बुधवार को गज़ब हुआ. रामचंद्र गैंगमैन जो अभी तक इस खेल से बाहर ही था उसने अकेले ने १०-१० रुपये की ५ चिट्ठियां डाली। उसने हर नाम के आगे एक संख्या भी लिखी थी.
१. प्रदीप कुमार २. विश्वजीत ३. नादिरा ४. सुनील दत्त ५. वहीदा रहमान

और उस दिन के चित्रहार में ये गाने आये.

१. जो वादा किया वो निभाना पड़ेगा।
२. पुकारता चला हूँ मैं।
३. आगे भी जाने ना तू.
४. ना मुह छुपा के जियों
५. पिया तोसे नैना लागे रे.

रामचंद्र के सारे अभिनेता अभिनेत्री के गाने आये थे और वो भी उसी क्रम में जो उसने सोचे थे. मुझे उसे १०० रुपये देने पड़े. उस दिन पहली  बार मुझे इस खेल में ४० रुपये का नुकसान हुआ था.
मैंने रामचंद्र से पूछा की भाई क्या राज़ है, तूने कैसे ये सारे अभिनेता पहचाने और वो भी क्रम में. इस पर रामचंद्र मुस्कुराता हुआ चला गया.
अगले दिन याने शुक्रवार को रामचंद्र ने २०-२० रुपये की छह चिट्ठियां डाली और फिरसे सारी चिट्ठियों के अभिनेताओं के गाने आये और वो भी उसी क्रम मेँ। और खास बात ये की उसने ६ चिट्ठियां डाली और चित्रहार में इस बार ६ गाने आये थे.  मुझे इस बार १०० रुपये का नुक़सान हुआ था और अब मैं ये खेल बंद करने की सोच रहा था. लेकिन मुझे इस बात का कुतूहल था की रामचंद्र इतना सटीक अंदाज़ा कैसे लगा लेता है.
 मैंने रविवार को रामचंद्र को घर पर दावत पर बुलाया और काफी शराब पिलाई और फिर से उसका राज़ पूछा। उसने बताने को मना कर दिया. फिर मैंने उसे समझाया की मैंने ये खेल बंद कर दिया है और अब उसे कोई फायदा नहीं होने वाला। और भी काफी मिन्नतें करने के बाद रामचंद्र अपनी बात बताने को राजी हुआ. रामचंद्र ने जो कहा वो सुनकर मैं अवाक् रह गया. उसने बताया की ये चिट्ठियां और पैसे उसे स्टेशन मास्टर देते थे और सुबह दुगुने पैसे वो मास्टर को दे कर आता था उसे इस काम के बदले १० रूपए दिए जाते थे.
  सोमवार को सुबह मैंने वो पैसे डालने वाला बक्सा कैंटीन के टेबल से हटाया और टेबल पर १ कागज़ पर बड़े अक्षरों में लिखा "आज से सब बंद". दोपहर के खाने के वक्त स्टेशन मास्टर कैंटीन में आये लेकिन मेरी उनकी तरफ देखने की हिम्मत नहीं हुयी. दोपहर के बाद जब उनके ऑफिस में कोई नहीं था मैं स्टेशन मास्टर से मिलने गया.
"आओ आओ मोहन कैसे आना हुआ " मास्टर जी ने पूछा।
"साहब आपको तो सब मालूम ही है" मैंने मुंह लटका के जवाब दिया।
"तो रामचंद्र ने तुम्हे बता ही दिया। अब बताओ ये खेल बंद करना है या नहीं। "
"क्यों शर्मिंदा कर रहे हैं साहब, अब ये सब बिलकुल बंद"
"ऐसा तुमने पहले भी कहा था".
"नहीं साहब हम तो सिर्फ खेल-खेलते थे, अब इस स्टेशन में दिन भर के काम के बाद लोगों का दिल लगा रहे इसलिए थोड़ी सी मस्ती तो चाहिए न साहब।  सोचिये ये सारा स्टाफ सालों से रोज यहाँ आता है वही काम रोज करता है और घर चला जाता है. इनकी ज़िन्दगी में कोई नयी चीज़, कोई कोई नई उत्तेजना ही नहीं थी. आप देखिये पिछले २ महीने से सारा स्टाफ पहले से ज्यादा उत्साहित दिखता है. आदमी को जीने के लिए कोई स्वप्न, कोई संघर्ष, कोई पहेली चाहिए होती है इसके बिना आदमी की ज़िन्दगी बेजान होती है. हमारे इस गाँव में खेल का कोई साधन नहीं, कोई नाटक नहीं होते ऐसे में ये लोग अपना दिल यहाँ लगा लें तो कौनसी बड़ी बात हो गयी",
"देखो मोहनलाल मुझे पता है की तुम पढ़े लिखे और समझदार हो. तुम चतुर भी हो और बोलते भी अच्छा हो लेकिन इससे ये मत समझना की बुरे को अच्छा साबित करने में सफल हो जाओगे. अगर सिर्फ खेल ही चल रहा था तो पिछले हफ्ते पैसा हारने के बाद आज तुमने "आज से सब बंद" का नोटिस क्यों रखा है?  आज जब तुम्हे नुकसान हुआ तब तुम्हे ये खेल बुरा लगने लगा. कभी सोचा है की अभी तक हर हफ्ते जब जब तुमने पैसा कमाया है किसी ना किसी ने गंवाया है. ये लोग मेहनत करके पैसा कमाते हैं वो क्या इस तरह जुए में उड़ाने के लिए? कैंटीन में टीवी मनोरंजन के लिए रखा था और जुआ खेलने के लिए नहीं. और जहाँ तक जीवन के उद्देश्य, उत्साह या स्वप्न की बात है, लोगो के पास हमेशा अच्छे और सकारात्मक विकल्प होते हैं लेकिन वो थोड़े मुश्किल होते हैं. लोगों को संघर्ष चाहिए, पहेली चाहिए लेकिन आसान पहेली, ऐसे संघर्ष जिनको सरलता से जीता जा सके. तुम कहते हो की लोगो को स्पर्धा, संघर्ष चाहिए और यहाँ खेल की सुविधाएँ नहीं है. तो "खेल की सुविधा ना होना" इसे तुम समस्या या पहेली क्यों नहीं मानते. क्या हमारे गाँव में खेल की सुविधाएँ तैयार करना  एक संघर्ष, एक उद्देश्य, एक ध्येय नहीं हो सकता? एक बात और सुनो। ये खेल नहीं हो रहा था ये व्यसन था. और हर व्यसन के पीछे ध्येय की कमी ये ही बहाना होता है फिर वो जुआ हो, शराब हो या तम्बाकू। लोग इस तरह के व्यसन आसानी ने पैसे खर्च करके खरीद लेते हैं और जीवन के असली संघर्ष और ध्येय की उपेक्षा करते हैं. फिर व्यसन ही इन  लोग को ध्येय उद्देश्य और आखिर में संघर्ष बन जाता है।  "

 "साहब मुझे माफ़ कर दीजिये,  सच में "आज से सब बंद। " मैंने अपराधी भावना से कहा.
" ठीक है जाओ".
"लेकिन साहब वो..... " मैं कुछ बोलने की कोशिश कर रहा था.

"मोहन तुम्हे तुम्हारे हारे हुए पैसे नहीं मिलेंगे" साहब ने हँसते हँसते कहा।

"नहीं साहब पैसे नहीं चाहिए पर ये तो बताईये की आपने सही अभिनेताओ की चिट्ठियां कैसे बनाई" असल में मुझे पैसे ही मांगने थे पर मैंने चतुराई से बात पलटते हुए कहा.

"वो तो बहुत आसान बात है कोई भी सोच सकता है, मेरा भतीजा दूरदर्शन में काम करता है और फ़ोन के बारे में तुमने सुना ही होगा" साहब मुझे चिढाते हुए बोले.
"ठीक है साहब" मैं उदास होकर जाने लगा।
"रुको मोहन ये लो १५० रूपए जो मैंने २ दिन में जीते हैं और इनसे हमारी कॉलोनी का ग्राउंड साफ़ करके समतल करवाओ और स्पोर्ट्स क्लब शुरू करो. एक फुटबाल और एक वॉलीबॉल भी खरीदों, तुम्हारे इस खेल के सभी खिलाडियों को आवश्यक रूप से वहां शामिल होना होगा. इससे लोगो का संघर्ष और प्रतिस्पर्धा सब बाहर आएगी और थोड़ी चर्बी भी कम होगी। और मैं भी २ दिन तुम्हारे खेल का खिलाडी रहा हूँ तो अब से मैं भी रोज शाम को वहीँ आऊंगा टीवी रात को १ घंटे ही ठीक है."